Saturday, 24 March 2018

जय श्री राम



आदौ राम तपोवानदी गमनं हत्वा मृग कांचनमं
वैदेही हरणं जटायू मरणं सुग्रीव संभाषणं ||
वाली निग्रहणं समुद्र तरणं लंकापुरी दाहनं
पश्चात रावण कुंभकर्ण हननं एतध्दी रामायणं||
(एक श्लोकी रामायणकवी तुलसीदास)

कवी तुलसीदास यांनी एका साध्या सोप्या श्लोकामधून रामायणाची गोष्ट सांगितली आहे, ज्यामुळे यातील ठळक घडामोडी चटकन लक्षात राहतात. मुळचे वाल्मिकी रामायण म्हणजे २४,००० श्लोकांएवढा विस्तार असलेले महाकाव्य आहे. प्राचीन कालीन वाङ्मयतील प्रतिभा, सर्जनशीलता यांची सर्वोत्कृष्ट उदाहरणे म्हणजे रामायण व  महाभारतासारखी काव्ये! ही काव्ये म्हणजे आपल्या संस्कृतीचा पाया आहेत. भारतीय म्हणवणाऱ्या प्रत्येकाला  हि माहित असतात. कारण आपल्या आजी आजोबांकडून यातील गोष्टी ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो असतो.
                      भारतीय वाङ्मयतील सर्वांत प्राचीन काव्य म्हणून रामायणाला 'आदि काव्य' असेदेखील म्हणतात. संपूर्ण रामायण 'अनुष्टुप' छंदातील श्लोकांमध्ये लिहिले आहे. यात एकूण ७ कांड आहेत- बाल कांड, अयोध्या कांड, अरण्य कांड, किष्किंधा कांड, सुंदर कांड, युद्ध  कांड व उत्तर कांड. यातील बाल कांड व उत्तर कांड म्हणजे मूळ वाल्मिकी रामायणाचा भाग नसून नंतर लिहिले गेले असे तज्ञांचे म्हणणे आहे. एकात एक गुंफलेल्या कथा म्हणजे त्या काळातील समाजजीवनाचे चित्रण व प्राचीन ऋषींची शिकवण यांचा मिलाफ आहे. उत्तर भारतातील पूर्व भागातील संस्कृती,सामाजिक जीवन आणि शहरीकरण याचे प्रतिबिंब रामायणात पाहायला मिळते.
                    भारतीय संस्कृतीत राम हा विष्णूचा सहावा अवतार मनाला जातो. त्रेतायुगामध्ये चैत्र शुद्ध नवमीला इक्ष्वाकु कुळात प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे रामायण! आपल्याकडे श्रीराम म्हणजे 'मर्यादापुरुषोत्तम' असे मानले जाते. मुळात 'आदर्शवाद' हा रामायणाचा गाभा आहे. आदर्श राजा- राम, आदर्श पत्नी- सीता, आदर्श बंधु- लक्ष्मण व भरत, तर आदर्श दूत- हनुमान अशी अनेक उदाहरणे यात पाहायला मिळतात. 'रामराज्य' म्हणजे सर्वांत परिपूर्ण प्रशासन असे मानले जाते. तसेच कितीही संकटे आली तरी शेवटी सद्गुणांचाच वाईट प्रवृत्तींवर विजय होतो हे यात वारंवार सांगितले आहे. आजच्या जगात चांगल्या गोष्टी टिकून राहण्यासाठी हा आदर्शवाद काही प्रमाणात आवश्यक आहे.
                 रामायणाची गोष्ट आपल्या जीवनातील निर्णय किंवा निवडीचे महत्त्व अधोरेखित करते. आपण कशाची निवड करतो यावर आपले पुढचे आयुष्य अवलंबून असते. असे म्हणतात की ‘You are always one decision away from an entirely different life’. रामायणातील पात्रांच्या बाबतीत हे वाक्य अगदी खरे ठरते. सर्वांची आयुष्ये एकेका निर्णयामुळे पूर्णतः बदलतात. एकीकडे युवराज राम पित्याच्या वचनासाठी राज्यत्याग करून वनवासी होतो तसेच सीता व लक्ष्मण देखील आपले वैभव सोडून त्याला साथ देतात. तसेच भरत बंधुप्रेमापोटी राज्य न स्वीकारता तपस्वी होतो. तर दुसरीकडे रावणासारखा बलाढ्य योद्धा रणांगणावर मृत्यूला समोर जातो. कुंभकर्ण व विभीषण दोघेही रावणाचेच भाऊ, पण दोघेही दोन विरुद्ध मार्ग निवडतात. दोघांनाही ठाऊक असते की  रावण चुकीचे वागतो आहे. पण कुंभकर्ण रावणाची साथ न सोडता युद्धात मरण स्वीकारतो तर विभीषण  रामाला शरण जातो व त्याला युद्धात सहाय्य करून नंतर लंकेचा राजा बनतो. यातील कोणाचे बरोबर कोणाचे चूक यापेक्षा महत्वाचे हे आहे की यातील सर्व पात्रे आपापले स्वतंत्र निर्णय घेतात आणि त्यांच्या आयुष्यातील बदलांना समर्थपणे न डगमगता सामोरे जातात.
                        आधुनिक काळात काही जण रामायणावर टीका करतात, त्यातील पात्रे परिपूर्ण नाहीत असे म्हणतात. पण मुळात राम-रावण म्हणजे देव-दानव असे न मानता रामायण म्हणजे उत्तर भारतीय आर्य संस्कृती व दक्षिणेच्या लंकेतील संस्कृती यातील कलहाचे चित्रण अशा दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले तर आपल्याला ते जास्त चांगल्या प्रकारे ते समजू शकेल. वास्तविक या दोन्ही संस्कृती पुढारलेल्या होत्या, येथील राज्ये वैभवसंपन्न होती. दोन्ही राज्यांमध्ये युद्ध झाले व त्यात आर्यांचा विजय झाला. रामायणाची गोष्ट रामाच्या किंवा आर्यांच्या बाजूने लिहिली आहे, त्यामुळे साहजिकच राम हा कथेचा नायक आहे व तो मर्यादापुरुषोत्तम दाखवला आहे. पण त्याचबरोबर त्यातील बाकीच्या पात्रांचे पैलू देखील अत्यंत बारकाव्याने दाखवले आहेत. म्हणूनच आपल्याला ही  सर्व पात्रे जवळची वाटतात. लोकांनी कितीही टीका केली तरी, आज दोन हजार वर्षे लोटूनसुद्धा रामकथेचा प्रभाव कायम आहे आणि यातच रामायणाचे श्रेष्ठत्व आहे. त्यामुळे रामायण हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा दर्जाचे अतिशय परिपूर्ण साहित्य आहे. ह्या आदिकाव्याचा प्रभाव केवळ भारतीय उपखंडच नव्हे तर दक्षिण पूर्व आशियाई देशांवरही आहे. थायलंड, इंडोनेशिया, कंबोडिया,  फिलिपिन्स अशा सर्व देशात रामायणाला अत्यंत महत्त्व आहे.
                         अशा या रामायणावर आज रामनवमीच्या निमित्ताने हा लेखनप्रपंच! आपल्यासाठी रामायण केवळ एक गोष्ट नसून आपल्याला जीवनमुल्ये शिकवणारे एक तत्त्वज्ञान आहे. कारण कितीही वेळा आपण रामायण वाचलेले असले तरी पुन्हा वाचताना त्यात आपल्याला नवनवीन गोष्टी उमजतात. लहानपणी राम-रावण युद्धाची गोष्ट रंजक वाटते, तर मोठे झाल्यावर त्यातील तत्वज्ञान आपल्याला समजू लागते. तसेच त्यातील पात्रांचे विविध पैलू आपल्याला समजतात त्याचबरोबर कर्तव्यानिष्ठा व नैतिकता यांचे महत्त्व अधोरेखित होते. आजच्या घडीला मौखिक परंपरा, चित्रकला, शिल्पकला, संगीत-नृत्य-नाट्य, चित्रपट व पुस्तके अशा अनेक माध्यमातून रामायण एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचत आहे. जे साहित्य स्थिर न राहता सतत निरनिराळ्या भाषातून व माध्यमातून लोकांपर्यंत पोचत राहते तेव्हा ते अजरामर होते. त्यामुळेच आपल्या संस्कृतीत असे म्हणतात, जोवर या जगात चंद्र-सूर्य आहेत तोवर ही रामकथा टिकून राहील. रामायणाचा कधीही न संपणारा प्रभाव पहिला की हे वाक्य अगदी तंतोतंत खरे आहे याची खात्रीच पटते!

                                                                                           सलील सावरकर- +६५  ८४३६०३४३
                                                  अनुजा जोगदेव-  +९१ ८९७५७६७५९९


            
                                                                                                 
  

Saturday, 17 March 2018

नव्या वर्षाची पूर्वसंध्या


                   नमस्कार! उद्या येणाऱ्या गुढीपाडव्याला आमच्या चित्रपंचांग या ब्लॉगला एक वर्ष पूर्ण होईल. सरत्या वर्षात आम्ही एकूण आठ भाग प्रदर्शित केले- गुढीपाडवा, अक्षय तृतीया, गुरुपौर्णिमा, गणेशोत्सव, नवरात्री,  दसरा, दिवाळी आणि उत्तरायण. सर्वच लेखांना तुम्ही मनापासून दाद दिली. मुख्य म्हणजे निरनिराळ्या वयोगटातील लोकांपर्यंत आमचे लेख पोचले आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवल्या. त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार!
                     ह्या ब्लॉगची सुरुवात करताना वास्तुकलेतील 'Renaissance’ ही संकल्पना आमच्या मनात होती. युरोपमध्ये १४ व्या शतकात Renaissance या चळवळीची सुरुवात झाली. Renaissance म्हणजे पुरातन अभिजात संस्कृतीचे नव्या रुपात पुनरुज्जीवन करणे.  १४व्या शतकाच्या आधीचा काही काळ dark ages म्हणून ओळखला जातो. १४व्या शतकात  इटलीतील बुद्धीमंत व कलाकारांनी सर्वात पुरातन अशा ग्रीक व रोमन काळातील अभिजात कलेचे पुनरुज्जीवन केले. यानंतर संपूर्ण युरोपात ही चळवळ पसरली. साहित्य, वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला अशा सर्व माध्यमांना नवीन एक नवीन वाट मिळाली आणि या सर्व कलांची भरभराट झाली... नव्या रुपात अभिजात कला जगासमोर आली आणि बहरली. जेव्हा आम्ही या चळवळीबद्दल वाचले तेव्हा आम्हाला असे वाटले की आपल्याकडे आपण Cultural Renaissance का करू नये? जागतिकीकरण, विकास, आधुनिकता हे सर्व कितीही आवश्यक असले तरी त्याचसोबत आपण आपली अभिजात तत्वे आणि संस्कृती पण जोपासायालाच हवी! आज आमच्या पिढीमध्ये भारतीय संस्कृतीची माहिती व अभिमान या दोन्हींचा  अभाव आढळतो. खरेतर संस्कृती किंवा परंपरा म्हणजे ओझे नसून आपल्याला चैतन्य देणाऱ्या गोष्टी आहेत. जर लोकांना याचा विसर पडत असेल तर त्यांना नव्या रुपात लोकांपर्यंत पोचवायलाच हवे. त्यामुळे आपली संस्कृती, परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे हा चित्रपंचांगचा उद्देश आहे.
                       लेखनाची पूर्व तयारी म्हणून वाचन करताना आम्हाला अनेक नवीन गोष्टी समजल्या. आपल्या संस्कृतीचे व तत्त्वज्ञानाचे नवे पैलू गवसले. आम्हाला जेवढ्या नव्या गोष्टी समजल्या तेवढा आपल्या संस्कृतीबद्दलचा आमचा आदर आणखीनच वाढला. तसेच तुमचे प्रोत्साहन असल्यामुळे प्रत्येक लेख लिहिताना  अधिकाधिक उत्साह वाटला.
                            मागच्या गुढीपाडव्याच्या लेखात आम्ही म्हणालो होतो की, हा दिवस म्हणजे नवनिर्मिती! रोजच्या जगण्याला समांतर असा नवनिर्मितीचा प्रवास आपण चालू ठेवायला हवा..तसाच चित्रपंचांग ब्लॉगचा प्रवास देखील पुढे सुरूच राहील. केवळ सणांवरच न लिहिता त्याचबरोबर आपली संस्कृती, वाङ्मय व परंपरा यावरदेखील लिहिण्याचा आमचा मानस आहे. भारतीय संस्कृतीसाठी आमच्या परीने केलेला cultural renaissance चा लहानसा प्रयत्न! येत्या रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीला आमचा नवीन लेख प्रसिद्ध होईल. तेव्हा तुमचा प्रतिसाद, पाठींबा आणि प्रतिक्रिया आम्हाला कायम मिळूदेत अशी आम्ही अशा करतो. आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


                                                                                                        सलील सावरकर- +६५  ८४३६०३४३
   अनुजा जोगदेव-  +९१ ८९७५७६७५९९
 

Threshold of new beginnings



Our Blog Chitra Panchang completes one year this Gudhi Padwa. We published a total of 8 blogs in the past year, which began on the auspicious occasion of Gudhi Padwa in 2017 with our last one being published around the Summer Solstice/ Uttarayan. Our patrons were instrumental in encouraging, stimulating our thoughts and helped us reach a wider audience in a very short time interval. We are indebted to all our readers from various age groups, diversities who appreciated our small efforts at revisiting our past with an understanding of the present.
                  
The idea to start this blog was an outcome of our readings about the European Renaissance which even today assumes a place of utmost significance for a lot of renewal and revival efforts across the world. Renaissance began as a small movement in medieval Europe in the 14th Century AD. It translates as ‘conscious revival efforts specially in the areas of art & culture based on the model of classical forms of art.’ It was only for a reason that the time around the 14th century Europe was known to be identified as the ‘Dark Ages’, with Europe seemingly at its lowest point in its global ranking graph. It seemed imperative for thinkers and scholars of Italy to revive and restore the classical forms of art dating to the Roman & Greek times. This movement spread all across Europe as an epidemic in the shortest possible time. Art, Literature and even social life seemed to have found a new lease of life keeping their context alive. This further enhanced progress in all forms of art, with newer innovations being carried out every forthcoming day. Classical Art from got a new breath of life and the world got introduced to a new ‘European Design Order’. One can only marvel at the diversities in Europe which have still gotten retained in spite of a mass movement. We realised the great potential the spirit of Renaissance entails, and thought of applying it to the Indian Context which is no way different from today’s Europe – an eclectic mix of cultures, with a common sense of spirit crossed our minds more than once. Modernism can thrive only on the robust pillars of our heritage and it is time for India to realise the full potential of its diverse and deep sense of heritage.
We decided to share our understanding of Indian culture through a bilingual blog – a modern age platform, which will reach maximum people sharing the same roots, and connecting newer minds in order to achieve the most sustainable way of life in the world – ‘Bharatiya Sanskruti’. Our readings about our culture and our traditions made us realise one thing “the more you read, the less you read.” The deeper we went into exploring unseen corners of our vast traditions, our sense of respect for our values and traditions grew multifold.
Last year, in our inaugural blog on Gudhi Padwa, we mentioned how this auspicious day is dedicated to ‘Innovation & Creation’. We need to strive to keep alive this thriving process of innovation in parallel with our daily dose of burgeoning activities. This is what we believe in, and will be reflected in our upcoming blogs.
We aim to write not just about our Festivals, but also shed light on Indian Culture, Literature, and traditions reflected through a wide array of Indian Arts.
                           
This is our very timid yet resolved attempt to seek renaissance of Indian Culture, We will be publishing our next blog this coming Rama Navami, or the ninth day of the month of Chaitra.
We intend to continue seeking your thoughts, best wishes and suggestions for all our coming blogs. We hope to reach a wider audience across diversities, and will be delighted to hear from all in the coming days.
Here’s wishing you all best wishes on this auspicious day of Gudhi Padwa or Spring New Year!

                                                                                                        Saleel Savarkar : +65-84360343
Anuja Jogdeo : +91-8975767599