Wednesday, 18 October 2017

Celebration of Light!


                   Deepavali, is that time of the year – where our hearts are filled with brightness and prosperity beckons our households. ‘The festival of lights’ as it is known popularly, Diwali can be seen as a torchbearer of Indian Culture and heritage. Indeed it is the most popular Indian Festivals and is known to be celebrated with great fervour all over the world. Deepavali is a culmination of different thoughts, a result of varied geographical incidences and historical records which have evolved, fused to form a weeklong celebration. The more popular version of Diwali is mostly limited to a day long festivities, but historically, Diwali was and still is celebrated over a span of 5 days in many parts of India.
            Bharata, being an agrarian community, all our festivities and culture is woven around the agricultural calendar. India, which still retains much of its agricultural ethos, has hence managed to sustain the practice of celebrating its festivities in conjunction with the Hindu Calendar which also follows the same seasonal order. By the end of Ashwin, the seventh month of the Hindu Calendar – the first lot of agricultural produce is ready for harvest – and it is time for farmers to sell their produce and reap fruits of their hard work. The economic stability arriving as a result of this made way for a perfect setting to celebrate a festival. And what better can it be, to light up your own households, usher in the goddess of wealth and feast with your loved ones! This tradition is thus followed even today, in spite of several people having diverted from their core agricultural businesses.
Facts are always complemented by mythology, which not only serves as a guiding lesson, but as an inspiration in several occasions. It is believed that Deepavali was the final concluding chapter to the great epic Ramayana, when Lord Rama defeated Ravana and returned home to ascend the throne in Ayodhya. Residents of the city welcomed their beloved King by lighting up earthen lamps all over the city. This according to many was the beginning of the festivities of Deepavali.
The first day of Deepavali, is ‘Govatsa Dvadashi’ also known as ‘Vasubaras’ which continues for five days upto ‘Yama Dvitiya’ or ‘Bhaubeej’. Each day has a unique flavour and a special reason to be celebrated. The day of ‘Vasuvaras’ is when ladies offer blessings to cow, which is the most holy animal in India, the land of farmers. The cow is worshipped and fed along with its calf – an ode to the strong relationship between a mother and her child and a thanksgiving to the animal, which played a key role in nourishment of Indian households in the earlier days. The next day is the thirteenth day after the new moon, called ‘Dhanteras’. It is believed that it was on this day that Goddess of Wealth – Lakshmi and The Father of Medicine – Dhanvantari were born. People often buy Gold to mark this day while many Ayurvedic Doctors offer their respects to Dhanvantari the father of Indian Medicine. The two principle days and highlights of this festival of lights are ‘Naraka Chaturdashi’ and ‘Lakshmi Pooja’. According to Indian Mythology, Lord Krishna relieved the world from the tyranny of Narakasura – a demon who had wreaked havoc on earth and in the heavens on this day.   The last day of Ashwin, on the night of new moon, Lord Vishnu wedded Goddess Lakshmi, who is believed to descend down to the earth on this day, every year to shower blessings on her devotees. Hence on the evening of Ashwin Amavasya, Indian families usher in the goddess of wealth by performing Lakshmi Pooja in their households. A notable feature of this occasion is that people from all backgrounds, all strata – stand a chance to seek blessings and change their fortunes with the hard work which  complements this worship.
                 The next day morning sun welcomes the first day of the month of Kartik, which is celebrated as the day of the New Year in many parts of India. It is interesting to note, that Indian Almanacs were a product of institutions patronised by Indian Kings. Many kings from parts of the country started their own calendars following a victory at the battlefield. Similarly, Vikramaditya the king of Ujjain started his own ‘Vikram Samvatsar’ on this day and the people of Ujjan began celebrating Deepavali to celebrated Vikramaditya’s victorious return
The most incredible aspect of stories attached with Diwali is their varied timelines and their diverse geographical locations. And yet the cohesive result is a concoction not worth missing at all! The common underlining message that the festival of Deepavali sends out - is ushering light into our lives. This can also be perceived as enlightenment, knowledge gain, or a simple innovation that can change lives around you. Deepavali is the time we shun darkness and attempt to light up a lamp in our mind. Symbolically, we light an earthen lamp outside our homes to welcome light and brightness in our homes. The tradition of Deepavali might well be a cyclic pattern following an order, but there is no end to how many times, one can empower himself to celebrate Deepavali in a year.
Indian festivals are concepts for learning. One can only marvel at the intellect of our enlightened forefathers - to institutionalise a festival to empower and enlighten us for generations together, one that has and will continue to throw ‘light’ on the darker corners of our minds.
Here’s wishing our readers a Happy and Prosperous Deepavali! Let us pledge to eliminate darkness across the world with the brightness of our minds ‘Tamaso Ma Jyotirgamaya!’
                                                                                                        Saleel Savarkar- 
+65-8436-0343
Anuja Jogdeo  
+91-8975767599

  

Tuesday, 17 October 2017

ज्योतीने तेजाची आरती!

         

       
          'दिवाळी'...हा शब्द कानावर पडल्याक्षणी आपल्या सर्वांची मने उत्साहाने आणि चैतन्याने भरून येतात! दिवाळीचे दिवस म्हणजे वर्षातील सर्वात मंगलमय आणि प्रकाशमान दिवस असतात. हा भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा सण आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अनेक ठिकाणी भारतीय वंशाचे लोक दिवाळी साजरी करतात. वर्षानुवर्षे साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणासोबत अनेक घटनाचे धागे गुंफले गेले आहेत, ज्यांच्यामुळे भारतीय उपखंडात दिवाळी साजरी होऊ लागली.
           पूर्वीपासून भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे अर्थातच आपले सण शेतीच्या हंगामावर निगडीत असत. अश्विन महिन्याच्या अखेरीस शेतीचा पहिला हंगाम संपलेला असायचा आणि धान्याची रेलचेल असायची. अशाप्रकारे आर्थिक स्थैर्य आल्यामुळे लोकांमध्ये सण साजरा करायचा उत्साह आलेला असायचा. याचबरोबर भारतातील वेगवेगळ्या प्रांतात दिवाळीशी निगडीत निरनिराळ्या पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यामुळे शेतीच्या सुबत्तेच्या दिवसांना धार्मिक जोड मिळाल्यामुळे भारतभर दिवाळी अगदी उत्साहात साजरी केली जात असे आणि आताही तीच परंपरा कायम आहे.
           असे म्हणतात, की दिवाळीची सुरुवात रामायणापासून झाली. विजयादशमीला रावणवध करून श्रीराम अयोध्येला परत आले. यानंतर अयोध्यावासियांनी नगरात दीप प्रज्वलीत करून आपला आनंद साजरा केला आणि अशाप्रकारे दरवर्षी दिवाळीची परंपरा सुरु झाली. नंतर काळानुसार यात नवीन कथांची आणि प्रथांची भर पडत गेली.
           आता आपल्याकडे वसुबारस म्हणजे गोवत्सद्वादशीपासून ते भाऊबीज म्हणजे यमद्वितीयेपर्यंत अशी आठवडाभर दिवाळी साजरी करतात. यातील प्रत्येक दिवसाला निराळे महत्त्व आहे आणि प्रत्येक दिवसासंदर्भात निरनिराळे युक्तिवाद आहेत. जसे की, गोवत्सद्वादशीला गाय-वासराची पूजा केली जाते. कारण शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणजे पशुपालन त्यात मुख्यत्वे गायी, त्यामुळे त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा तो दिवस आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथनातून 'धन्वंतरी' म्हणजे देवांचा वैद्य आणि 'लक्ष्मी' यांचा जन्म झाला असे मानतात. त्यामुळे यादिवशी या दोन्हींचे पूजन करण्याची प्रथा सुरु झाली. दीपावलीचे प्रमुख दोन दिवस म्हणजे नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन! भागवत पुराणानुसार अश्विन वद्य चतुर्दशीला श्रीकृष्णाने स्वर्ग आणि पृथ्वी वर राज्य करणाऱ्या नरकासुराचा वध केला. त्यामुळे सर्व देवांची आणि मानवांची या दुष्ट असुरापासून सुटका झाली. या विजयाची आठवण म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. याचबरोबर अश्विन अमावास्येच्या दिवशी सायंकाळी विष्णु-लक्ष्मी यांचा विवाह संपन्न झाला. तसेच असे मानतात, की या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी आपल्या भक्तांना भेटायला त्यांच्या घरी जाते म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा पडली. त्या अमावास्येनंतर नव्याने उगवणारा चंद्र घेऊन येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा! उज्जैनच्या विक्रमादित्य राजाने या दिवसापासून विक्रम संवत्सर सुरु केले. विक्रमादित्याच्या पराक्रमाची आठवण म्हणून त्याच्या प्रजेने दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली असेही मानले जाते. याचबरोबर असे म्हणतात, की वामनावतारातील विष्णूंनी पाताळात धाडलेला बळी राजा आजच्या दिवशी त्याच्या प्रजेला भेटायला येतो. म्हणून या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणतात. त्यामुळे या दिवशी काही ठिकाणी बळीराजाची पूजा केली जाते. अशा वैशिष्ट्यपूर्ण पौराणिक कथा म्हणजे दिवाळीचे रंजक पैलू आहेत.
           आश्चर्याची बाब अशी की, ह्या सर्व दिवसांच्या कथा या एकमेकांशी संबंधित नाहीत, परंतु हे सर्व दिवस एकत्र मिळून जी होते ती दिवाळी! कारण दिवाळी म्हणजे केवळ एका दिवसाचा सण नाही तर संपूर्ण आठवडाभर चालणारा आनंदाचा उत्सव आहे. तसेच दीपावलीची एक अशी परंपरा आहे, जी यातील प्रत्येक दिवशी पाळली जाते ती म्हणजे सायंकाळी घराबाहेर दिवे किंवा पणत्या लावणे. कारण दीपावली या शब्दाची व्युत्पत्तीच आहे, 'दीप’-'आवली'...म्हणजे अंधःकाराचा विनाश करण्यासाठी प्रज्वलित केलेल्या दिव्यांच्या ओळी! गोमाता, धन्वंतरी, विष्णु, लक्ष्मी किंवा महाबली यापैकी कोणाचेही पूजन असले तरी आपण रोज सायंकाळी पणत्या लावतो. कारण दिवाळी हा खरेतर प्रकाशाचा आणि तेजाचा सण आहे. पंचमहाभूतांपैकी एक तत्व म्हणजे अग्नी किंवा तेज! आपण भारतवर्षातील लोक हे अग्नीचे उपासक आहोत. आपल्या संस्कृतीत अग्नी ही सर्वात पवित्र गोष्ट समजली जाते. तसेच तेज तत्वाशी निगडीत असलेले मणिपूर चक्र म्हणजे बुद्धिमत्ता आणि शक्ती यांचे प्रतीक मानले जाते. अशा या अग्नीचे व तेजाचे प्रतीक असलेला दीप प्रज्वलित करणे म्हणजे अंधःकार दूर करणे आणि प्रकाशाकडे वाटचाल करणे. पौराणिक कथा हे एक निमित्त झाले, पण दिवाळीच्या पणत्या ह्या केवळ बाहेरचा काळोखच नाही तर आपल्या अंतःकरणातील अंधःकार दूर करण्यासाठी असतात...मग तो अंधार कोणताही असो, अज्ञानाचा, अन्यायाचा किंवा असत्याचा! हा अंधःकार नष्ट झाला तरच आपली प्रगती होऊ शकते. दिवाळीच्या निमित्ताने 'प्रकाशाचा उत्सव' ही संकल्पना भारतीय संस्कृतीत रुजवणाऱ्या आपल्या पूर्वजांची बुद्धीमत्ता खरोखरच अलौकिक आहे.
           आमच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या तेजोमयी शुभेच्छा!! या दिवाळीला लक्ष लक्ष पणत्यांच्या ज्योतींनी आपण या विश्वातील तेजाचे पूजन करून आपल्या मनातील अंधःकार दूर करू...तमसो मा ज्योतिर्गमय!
                                                                                                  सलील सावरकर- +६५ ८४३६०३४३
अनुजा जोगदेव- +९१ ८९७५७६७५९९



Friday, 29 September 2017

विजयादशमी

विजयादशमी

                नवरात्र संपत आले की चाहूल लागते ती पुढे येणाऱ्या सणासुदीच्या मोसमाची..पावसाळा जवळ जवळ संपत आला आहे आणि त्याचबरोबर शेतीचा हंगाम देखील पूर्ण होत आला आहे. त्यामुळे आता पुढच्या मोठ्या सणासाठी आपण सगळेच सज्ज होत आहोत..अशावेळी पुढे येणाऱ्या चैतन्यपूर्ण उत्सवाची सुरुवात करून देण्यासाठी म्हणून जो महत्वाचा व आनंददायी दिवस येतो, तो म्हणजे अश्विन शुद्ध दशमी अर्थातच दसरा किंवा दशहरा !  
                 आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो पण सर्वांत विलक्षण बाब अशी आहे  की, दसरा हा एकमेव सण आहे की जो रामायण आणि महाभारत या दोन्ही काव्यातील महत्वाच्या घटनांसोबत गुंफला गेला आहे. आजच्या दिवशी श्री रामचंद्रांनी घनघोर युद्ध करून रावणाचा वध केला आणि अशाप्रकारे वानरसेनेचा विजय झाला. याचबरोबर दसऱ्याच्याच दिवशी पांडवांचा एक वर्षाचा अज्ञातवास संपला. आपला अज्ञातवास यशस्वीपणे पार पडल्यावर त्यांनी शमी वृक्षाच्या ढोलीत लपवलेली आपली शस्त्रे पुन्हा धारण केली. या दोन्ही घटना फारच परिवर्तनकारक ठरल्या. कारण रावणवधानंतर लंकेतील युद्धाची सांगता झाली व राम वनवास संपवून अयोध्येस परत जायला निघाले आणि पांडवांचा अज्ञातवास संपल्यानंतर काही काळातच कुरुक्षेत्राचे महायुद्ध झाले, त्यामुळे पुन्हा शस्त्र ग्रहण ही अप्रत्यक्षपणे युद्धाची नांदीच ठरली.
                     यांचबरोबर अशा अनेक कथा आहेत, ज्या दसऱ्याच्या दिवसासोबत जोडल्या गेल्या आहेत. आज दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला आणि सृष्टीला नवजीवन दिले. दक्षिण भारतात या देवीला चामुंडा किंवा चामुंडेश्वरी असे म्हणतात. महिषासुर वधानंतर घटस्थापनेला बसलेल्या देवींचे विसर्जन होऊन नवरात्रीची सांगता होते. तसेच याच दिवशी आपण सरस्वती पूजन देखील करतो. याचबरोबर असे म्हणतात कि आजच्याच दिवशी कुबेराने कौत्साच्या विनंतीवरून अयोध्येबाहेर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला.   त्या मुद्रा ज्या भागात पडल्या होत्या त्याच्या आजूबाजूस आपट्याची झाडे होती. म्हणून आजच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा पडली आहे.
                      शिवाजी महाराजांच्या काळात या दिवशी त्यांचे मावळे शेतीची कामे आटपून पुन्हा सैन्यात सामील होत असत. कारण चार महिन्यांचा पावसाळा संपल्यावर दसऱ्याच्या दिवशी युद्ध मोहिमांना पुन्हा सुरुवात होत असे. त्यामुळे पूर्वीच्या काळी राजांच्या दृष्टीने हा दिवस त्याच्या सामर्थ्य प्रदर्शनासाठी महत्वाचा असायचा कारण याच दिवशी 'सीमोल्लंघन' केले जात असे. अशा निरनिराळ्या घटनांचे एकत्रितरित्या महत्व लाभल्यामुळे भारतभर हा दिवस महत्वाचा मानला जातो. मग तो  दिल्लीतील भव्य रावण दहन सोहळा असो अथवा म्हैसूरच्या चामुंडेश्वरीची राजेशाही थाटातील मिरवणूक, आजचा दिवस हा शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असल्यामुळे मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.
                  दसऱ्याच्या दिवसाचा आणखी एक पैलू म्हणजे महाराष्ट्रात दशमीच्या दिवशी तर दक्षिण भारतात नवमीच्या दिवशी केले जाणारे आयुध पूजन! सैनिकांची शस्त्रे, कामगारांची अवजारे, तंत्रज्ञांची यंत्रे  किंवा लेखकांची लेखणी, ही सर्वच आयुधे म्हणजे त्या त्या व्यक्तींचे सामर्थ्य आहे. आपल्यातील गुणांना आणि  विचारांना मूर्त स्वरुपात आणण्यासाठी ही आयुधेच फार मोलाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे अशा आयुधांच्या प्रति आदर आणि कृतज्ञता दर्शविण्यासाठी म्हणून ही पूजा करतात.
                   दसरा या शब्दाची व्युत्पत्ती पहिली तर ती आहे 'दश'- ‘हरा' ; म्हणजे दुष्ट प्रवृत्तींचा विनाश  आणि  अर्थातच चांगल्या गोष्टींचा वाईट प्रवृत्तींवर विजय, म्हणून या दिवसाला 'विजयादशमी' असेदेखील संबोधले जाते. आजच्या दिवशी सांगितली जाणारी राम-रावणाची गोष्ट म्हणजे विजयादशमीचा पाया आहे. खोलात विचार करून पहिले तर असे वाटते की राम आणि रावण ही दोन विचारधारांची प्रतीके आहेत. ह्या दोन व्यक्तीरेखा म्हणजे मानवी मनाच्याच दोन बाजू आहेत. राम म्हणजे चांगुलपणा आणि सद्विवेक बुद्धी तर रावण म्हणजे खल मनोवृत्ती आणि अहंकार! आपण कोणीच परिपूर्ण नसतो, त्यामुळे आपल्या मनात राम आणि रावण कायमच वास करत असतात, पण महत्वाचे हे आहे की आपण कोणती बाजू स्वीकारतो! राम रावणाच्या गोष्टीत ज्याप्रमाणे राम रावणाचा वध करतो त्याचप्रमाणे स्वतःमधील चांगल्या गुणांची कास धरून स्वतःच्याच दुर्गुणांवर मात करणे म्हणजेच खरी विजयादशमी! माणसाचा स्वतःच्या सद्विवेकबुद्धीवरचा विश्वास टिकून राहावा या कारणासाठी म्हणून दसरा हा सण महत्त्वाचा आहे.
                       आमच्या सर्व वाचकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्वांच्याच आयुष्यात खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी होऊदेत हीच आमची सदिच्छा!

                                                                                                        सलील सावरकर- +६५  ८४३६०३४३
   अनुजा जोगदेव-  +९१ ८९७५७६७५९९

  

Monday, 25 September 2017

या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता!


        

          अनादी अनंत काळापासून अस्तित्वात असलेली वैश्विक ऊर्जा म्हणजे 'शक्ती'...संपूर्ण विश्वाची जननी मानली जाणारी ही ऊर्जा 'आदिशक्ती' या नावाने संबोधली जाते. आदिशक्ती ह्या विश्वातील गतिमान चैतन्याचे प्रतिनिधित्व करते. आपल्या संस्कृतीतील सिद्धांतानुसार 'ब्रह्मा-विष्णु-महेश' हे जगाच्या मूलस्थानी आहेत आणि शक्ती ही या त्रिमूर्तींच्या केंद्रस्थानी आहे. तिच्यातील गुणांद्वारे ती त्रिमूर्तींसोबत जोडली गेली आहे. राजस गुणाद्वारे ती ब्रह्मासोबत, तामस गुणातून महेशासोबत तर सत्वाद्वारे विष्णूशी जोडली गेली आहे. त्यामुळे शक्ती म्हणजे ब्रह्मदेवाची नवनिर्माण ऊर्जा, विष्णूची बुद्धिमत्ता आणि महेशाची संहारक ऊर्जा यांचा संगम आहे. म्हणून शक्ती ही अशी स्वयंनिर्मित गोष्ट आहे जी कधीच कोणी निर्माण करू शकत नाही आणि नष्ट देखील करू शकत नाही.

           अशा या आदिशक्तीचेच एक रूप म्हणजे दुर्गा किंवा महिषासुरमर्दिनी! महिषासुर या दैत्याचा विनाश करण्यासाठी सर्व देवांनी दुर्गेला पाचारण केले. देवी व दैत्यामध्ये ९ दिवस आणि ९ रात्री युध्द चालले आणि दहाव्या दिवशी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि सृष्टीला अंतापासून वाचवले. देवीने दैत्याचा संहार केला या घटनेची आठवण म्हणून आपण नवरात्री किंवा दुर्गा पूजेचा उत्सव साजरा करतो आणि या आदिशक्तीची उपासना करतो. संपूर्ण भारतात तसेच नेपाळ व बांगलादेश येथे अनेक वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जात आहे. या नऊ दिवसांमध्ये दुर्गेसोबतच महालक्ष्मी आणि सरस्वती या देवींचे पण पूजन केले जाते. ठिकठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी देवीची स्थापना केली जाते आणि विजयादशमीच्या दिवशी त्यांचे विसर्जन करतात.

           सिंह किंवा वाघावर आरूढ अष्टभुजा दुर्गादेवी म्हणजे विश्वजननीने अन्याय आणि वाईट प्रवृत्त्तीचा संहार करून जगाचे संरक्षण करण्यासाठी धारण केलेला उग्र अवतार आहे. तिच्या आठ हातांमध्ये देवांनी तिला प्रदान केलेली अस्त्रे आहेत. शंख, चक्र,धनुष्य-बाण, ढाल-तलवार, भाला आणि फास ही आयुधे तिने हातांमध्ये धारण केली आहेत. तिची आयुधे म्हणजे स्वयंशिस्त, निस्वार्थीपणा, भक्ती, ध्यान आणि चैतन्य यांची रूपके आहेत. आयुधे म्हणजे प्रत्येक योद्ध्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे बुद्धीचे उपासक दुर्गेच्या हातांमध्ये इतर शस्त्रांसोबत लेखणी देखील दाखवतात, कारण त्यांच्यासाठी लेखणी हेच शस्त्र आहे. म्हणूनच दुर्गेचे रूप हे परिवर्तनशील आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरील उग्र व तीव्र भाव म्हणजे विनाशकारी प्रवृत्तीच्या विरोधासाठी उमटलेल्या रागाचे प्रतिबिंब आहे, पण याचबरोबर ती आपल्या भक्तांसाठी उदार आणि दयाळू आहे.

           व्युत्पत्तीशास्त्रानुसार 'दुर्गा' या शब्दाचा अर्थ आहे 'अगम्य' किंवा ‘अजिंक्य'! आपल्यासाठी दुर्गा म्हणजे केवळ पौराणिक देवता नसून एक संज्ञा आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या राष्ट्राला एकत्र जोडणारे गीत 'वंदे मातरम'! स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लिहिल्या गेलेल्या या गीतामागील प्रेरणासुद्धा दुर्गाच होती. तसेच आपण आपल्या जन्मभूमीला 'भारत माता' असे संबोधतो, ही धर्मनिरपेक्ष संज्ञा आहे. कारण आपली 'भारत माता' म्हणजे केवळ हिंदूच नाही तर भारतभूमीवरील सर्व लोकांचे संरक्षण करणाऱ्या 'जगत्तारिणी दुर्गा' या रुपावरच आधारित आहे. प्रखर दुर्गा असो किंवा शांत सरस्वती, संपन्न लक्ष्मी असो किंवा तेजस्वी भारत माता, या सर्व रूपांच्या मागची संकल्पना एकच ती म्हणजे -- 'संरक्षक सार्वभौम आदिशक्ती'!. अशा अद्वितीय संकल्पनेतूनच आपल्याला भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाची जाणीव होते.

           याचबरोबर देवी ही एका महत्वाच्या गोष्टीचे प्रतीक आहे, ते म्हणजे 'सृजनाचे'! सर्जनशीलता म्हणजे या विश्वातील प्रबळ गोष्ट आहे. शौर्य, बुद्धिमत्ता, कला, ऐश्वर्य आणि सौंदर्य यांचा मिलाफ असलेली तसेच वाईट प्रवृत्तीचा नाश करून विश्वाला नवजीवन देणारी देवी म्हणजे मूर्तिमंत सर्जनशीलता! म्हणूनच नवरात्री हा सृजनाचा-सर्जनशीलतेचा उत्सव व्हावा, असे आपल्या पूर्वजांना वाटले असेल. त्यामुळे प्रत्येकानी आपल्यातील सर्जनशीलतेचे चैतन्य जागृत ठेवणे म्हणजेच या आदिशक्तीचीची खऱ्या अर्थाने केलेली उपासना!



                                                                                                 सलील सावरकर- +६५ ८४३६०३४३

अनुजा जोगदेव- +९१ ८९७५७६७५९९





Sunday, 27 August 2017

Festival of Joy!



            A year’s wait is finally over and Maharashtra’s most revered God, has now adorned all our households . ‘Ganpati Bappa’ as he is affectionately referred to, is every believer’s best friend, confidant. His arrival, signifies the dawn of a new beginning, every time he visits.  There is a unique character to this form of God, which we truly believe, is one of the best manifestations of India’s  Artistic innovation spirit. The unique curve, formed as a result of the rolled up trunk of Ganesha, is something, that we commonly find in nature. This strong resemblance and reflection in the form of Ganapati, signifies how complete the artistic creation is! It is only fitting to refer to Ganapati as the ‘Master of all Arts’, because of the comprehensive nature of his form. Likewise, art is bound to be a gift of and for this lord. Art is the product of a sum of knowledgeable ideas of the brain. Is it  because of this, that Ganapati is also referred to as the ‘God of Wisdom’? Perhaps yes!

Ganesha, is an artist’s favourite recipe. It can be handcrafted to reflect the diverse, creative thoughts of artists across the globe. Ganesha can hence be found sculpted, painted, and assembled in a variety of poses, age groups, actions. The sundry of his forms can also be found as a result of the advances and innovations in the fields of art, as also the geo political diversity.
One of the most striking features of this human sculpted God Forms, are the emptions depicted in the eyes of his idols. These emotions, are real, adorable, command respect and highly communicative – a superb mix nowhere to be found in the world. Knowingly, unknowingly, we all fall in love with him. People of all age groups, backgrounds indulge in long conversations with him. We all vaguely remember doing this at some point in our childhood, and even sometimes today.
            It is only interesting to note, that ‘Vignaharta’ as he is referred to in the recent times, was once considered as a demi God, having mysterious powers. One does not exactly know when, but Ganapati is the latest addition to the long, varied list of Indian Gods & Goddesses!
            According to mythological stories, Ganapati, was named so because he was the chief commander of the army of Gods. Likewise he also plays a crucial role in assisting Maharshi Vyas in penning down Mahabharata, India’s  biggest bestseller!
            The attraction for this superior blend of Elephant-Human God isn’t just limited to the boundaries of modern day India, but has transcended borders, and seamlessly blended  with the cultures and traditions across Asia, and also parts of Europe.
Ganapati has played a crucial role in shaping India’s political landscape, tracing back to the time of the British Rule in India. Lokmanya Bal Gangadhar Tilak, one of India’s brightest revolutionaries, and a staunch Congressman, gave a clarion call to unite Indians to fight the British by celebrating Ganesh Utsav in public domain in the year 1892. Interestingly, this year marks the 125 year celebrations of the very festival which was started in small alleys of Pune, and has now become Maharashtra’s biggest tourist attractions. Getting the sacred, protected God out of the sanctum sanctorum of the temple and holding a public installation was one of the most revolutionary concepts introduced in Hindu Religion.  Ganeshotsav played a pivotal role in uniting the already distributed, Indian public into a robust, indisputable army of spirited minds.
Today, Ganeshotsav has crossed the boundaries of continents, and is celebrated with much fervour across the world. But lest we forget, that Ganapati is a thread that binds us into the spirit of knowledge based unity. He stands for the values which know no color, no race.
It is know more than clear, why those celebrating this festival long so much for an entire calendar year to welcome their favourite God into their humble abodes. After 10 days of fun, frolic, it is time to bid our beloved Bappa a tearful farewell, only to meet next year, sooner than this. The idea behind immersing the idol signifies the high intellect of our spiritual thinkers. Ganapati is believed to be a representation of the Energy Circle or ‘Chakra’ that exists around us. This ‘Chakra’ is the foundation of the other Chakras . Energy is an entity which is never lost, but converts its form from another. Likewise, the idol too, becomes one with the water after immersion and maintains the energy balance in the cosmic universe. It gives a message to not limit our belief in the physical form of God, but also to think beyond in identifying the presence of God in all places around us.
                                                                                                      
  Saleel Savarkar - + 91-98239-00318
Anuja Jogdeo +91-89757-67599


Saturday, 26 August 2017

आनंदोत्सव!!!

          

                             

         
          दरवर्षी आपण ज्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतो तो पाहुणा आपल्या घरी आला आहे आणि या दहा दिवसांच्या आनंदोत्सवाची सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांनाच तो अगदी जवळचा वाटतो जणू काही आपल्या घरातीलच एक व्यक्ती असावी, त्याचे आगमन आपल्या घरात निराळेच चैतन्य आणते. जर आपण असे मानले कि माणसानेच हे निरनिराळ्या प्रकारचे देव निर्माण केले आहेत, तर त्यामध्ये 'गणपती' ही निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. 'सोंडेची वक्राकार रेष' ही गणपतीच्या आकृतीचे प्रतिनिधित्व करते आणि ही वक्राकार रेषा आपल्याला निसर्गात अनेक ठिकाणी आढळून येते. म्हणूनच गणपती हा खरोखर सर्वव्यापी देव आहे. एक सोपी वक्राकार रेघ, पण त्यामागची संकल्पना किती व्यापक आहे! आता ज्या देवाची आकृतीच सर्जनशीलतेचे आणि सौंदर्याचे प्रतीक आहे तर तो देव कलाकारांचा अर्थातच लाडका असणार! त्यामुळे गणपती हा बुद्धी आणि कला यांचा सुरेख मेळ आहे.
           कलाकारांचा आवडता देव गणपती आहे याचे आणखी एक कारण म्हणजे गणपतीचे स्वरूप निरनिराळ्या प्रकारांना अनुकूल आहे. पुरातन कालीन माहितीनुसार गणपतीचे एकूण ३२ प्रकार आहेत. त्यात बाल-गणेश, वीर-गणेश, भक्ती-गणेश किंवा नृत्य-गणेश अशा अनेक प्रकारांची नोंद आढळते. बदलत्या कलेच्या शैलीनुसार गणपतीचे प्रत्येक ठिकाणी निराळे स्वरूप असते. त्यामुळे अगदी जुन्या काळातील मंदिरांमधील मूर्ती, शिल्पे व चित्रे ते आजच्या काळातील ‘Modern Ganesha’, प्रत्येक कलाकार आपल्या आवडीनुसार गणपतीला चित्रित करतो. शैलीचे स्वातंत्र्य आणि पावित्र्याचे बंधन अशा स्वरुपात गणपतीचे निरनिराळ्या प्रकारात चित्रीकरण केले जाते. त्यातले कोणते स्वरूप अधिक चांगले आहे यापेक्षा महत्वाचे हे आहे की प्रत्येक प्रकारात गणपतीच्या स्वरूपाचे पावित्र्य आणि सौंदर्य कायम राहते. ही गोष्ट म्हणजे गणपतीच्या स्वरूपाच्या सर्जनशीलतेचा पुरावा आहे. गणपतीमधील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव! भोवतालच्या जगात कोठेच न सापडणारे ते भाव आपल्याला आपल्या बाप्पाच्या डोळ्यात दिसतात. कळत नकळत आपण सर्वच त्याच्या निरागसतेसोबत जोडले जातो. म्हणून आपल्याकडे गणपती हा अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा लाडका असतो. आपल्याला तो कायम आपला सखा-सोबती असल्यासारखा वाटतो.
           पुरातन काळापासून गणपतीला 'विघ्नहर्ता' असे संबोधले जाते. तसेच देवासुरांच्या युद्धात तो देवांचा सेनापती होता असे मानतात. महाभारतासारखे महाकाव्य लिहिण्यासाठी लेखनिक म्हणून श्री व्यास ऋषींनी गणेशाचीच निवड केली आणि त्याने ते कार्य यशस्वीपणे पार पाडले. बुद्धीचा व कलेच देव, चौसष्ठ कलांचा अधिपती व गणांचा अधिपती अशा अनेक विशेषणांनी त्याची महती गायली जाते. आपल्याकडे सर्वात जास्त पूजिला जाणारा देव म्हणजे गणपतीच आहे. केवळ भारतातच नाही तर नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड सारख्या देशात फार पूर्वीपासून हा देव पूजिला जातो. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतो.
               गणपती खऱ्या अर्थाने आपल्या सर्व समाजाला संघटीत करणारा देव झाला ते लोकमान्य टिळकांमुळे! शिवाजी महाराजांच्या काळापासूनच आपल्याकडे प्रत्येक घरात भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात गणपती बसत असे. पण ब्रिटीशांचे राज्य आल्यावर या प्रथेचा राजाश्रय नाहीसा झाला. तसेच त्याच वेळी ब्रिटीशांनी स्थानिक लोकांना एकत्र येऊन सभा भरवणे किंवा काही कार्यक्रम करण्याची
बंदी घातली होती. पण लोकमान्यांनी यावर एक युक्ती योजिली, त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. देवघरातील गणेशाची भर चौकात प्राणप्रतिष्ठा करणे हा विचारच फार अभिनव आणि क्रांतिकारी होता. पण त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्तानी १० दिवस सर्व स्तरातील लोक एकत्र येऊ लागले. सर्व एकत्र जमून सभा घेऊ लागले, ब्रिटीश विरोधी कारवाया आखू लागले. याला धार्मिक महत्व असल्यामुळे ब्रिटीशांना यावर बंधनही घालता आले नाही. अशाप्रकारे एका लोकव्यापी चळवळीची सुरुवात झाली आणि गणेशोत्सवामुळे लोकांना संघटन शक्तीची जाणीव झाली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या उत्सवाचे स्वरूप बदलत गेले. आजच्या काळात जगभरात गणेशोत्सव साजरा करतात. प्रत्येक ठिकाणी तेथील मराठी माणसे एकत्र जमून निरनिराळे कार्यक्रम करतात, लोकांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यामुळे गणपती हा आपल्या सर्वांना बांधून ठेवणारा धागा आहे. आपल्या संस्कृतीचा जतनकर्ता आहे. 'गणपती बाप्पा मोरया' चा गजर आपल्या सगळ्यांमध्ये नवे चैतन्य आणतो, आपल्या सर्वांना एकत्र जोडतो. वर्षातील हे १० दिवस आपल्यासाठी उत्साहाने भरलेले असतात.
           या आनंदोत्सवाची सांगता झाल्यावर अनंत चतुर्दशीला गणपतीला प्रेमाने निरोप देऊन त्याच्या मूर्तींचे विसर्जन करतात. त्या प्रथेमागेदेखील एक अध्यात्मिक विचार आहे. गणपती हा उर्जेच्या चक्राचे प्रतिनिधित्व करतो असे मानले जाते. ऊर्जा चक्र हे इतर सर्व चक्रांचा पाया आहे. आपल्या सर्वांना माहित असलेल्या उर्जेच्या सिद्धांतानुसार ऊर्जा कधीच नष्ट होत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्यात हस्तांतरण होते. त्यामुळे गणपतीची मूर्ती विसर्जित झाली तरी ते तत्व, ती ऊर्जा मात्र चिरंतन टिकून राहते. अशाप्रकारे त्यानंतर केवळ मूर्तीत अडकून न राहता त्यापलीकडील असा मूर्ततेकडून अमूर्ततेकडे आणि सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारा आपला प्रवास सुरु होतो.
                                                                                                 
                                                                                                         सलील सावरकर- +९१ ९८२३९००३१८
अनुजा जोगदेव- +९१ ८९७५७६७५९९