Friday, 29 September 2017

विजयादशमी

विजयादशमी

                नवरात्र संपत आले की चाहूल लागते ती पुढे येणाऱ्या सणासुदीच्या मोसमाची..पावसाळा जवळ जवळ संपत आला आहे आणि त्याचबरोबर शेतीचा हंगाम देखील पूर्ण होत आला आहे. त्यामुळे आता पुढच्या मोठ्या सणासाठी आपण सगळेच सज्ज होत आहोत..अशावेळी पुढे येणाऱ्या चैतन्यपूर्ण उत्सवाची सुरुवात करून देण्यासाठी म्हणून जो महत्वाचा व आनंददायी दिवस येतो, तो म्हणजे अश्विन शुद्ध दशमी अर्थातच दसरा किंवा दशहरा !  
                 आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो पण सर्वांत विलक्षण बाब अशी आहे  की, दसरा हा एकमेव सण आहे की जो रामायण आणि महाभारत या दोन्ही काव्यातील महत्वाच्या घटनांसोबत गुंफला गेला आहे. आजच्या दिवशी श्री रामचंद्रांनी घनघोर युद्ध करून रावणाचा वध केला आणि अशाप्रकारे वानरसेनेचा विजय झाला. याचबरोबर दसऱ्याच्याच दिवशी पांडवांचा एक वर्षाचा अज्ञातवास संपला. आपला अज्ञातवास यशस्वीपणे पार पडल्यावर त्यांनी शमी वृक्षाच्या ढोलीत लपवलेली आपली शस्त्रे पुन्हा धारण केली. या दोन्ही घटना फारच परिवर्तनकारक ठरल्या. कारण रावणवधानंतर लंकेतील युद्धाची सांगता झाली व राम वनवास संपवून अयोध्येस परत जायला निघाले आणि पांडवांचा अज्ञातवास संपल्यानंतर काही काळातच कुरुक्षेत्राचे महायुद्ध झाले, त्यामुळे पुन्हा शस्त्र ग्रहण ही अप्रत्यक्षपणे युद्धाची नांदीच ठरली.
                     यांचबरोबर अशा अनेक कथा आहेत, ज्या दसऱ्याच्या दिवसासोबत जोडल्या गेल्या आहेत. आज दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला आणि सृष्टीला नवजीवन दिले. दक्षिण भारतात या देवीला चामुंडा किंवा चामुंडेश्वरी असे म्हणतात. महिषासुर वधानंतर घटस्थापनेला बसलेल्या देवींचे विसर्जन होऊन नवरात्रीची सांगता होते. तसेच याच दिवशी आपण सरस्वती पूजन देखील करतो. याचबरोबर असे म्हणतात कि आजच्याच दिवशी कुबेराने कौत्साच्या विनंतीवरून अयोध्येबाहेर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला.   त्या मुद्रा ज्या भागात पडल्या होत्या त्याच्या आजूबाजूस आपट्याची झाडे होती. म्हणून आजच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा पडली आहे.
                      शिवाजी महाराजांच्या काळात या दिवशी त्यांचे मावळे शेतीची कामे आटपून पुन्हा सैन्यात सामील होत असत. कारण चार महिन्यांचा पावसाळा संपल्यावर दसऱ्याच्या दिवशी युद्ध मोहिमांना पुन्हा सुरुवात होत असे. त्यामुळे पूर्वीच्या काळी राजांच्या दृष्टीने हा दिवस त्याच्या सामर्थ्य प्रदर्शनासाठी महत्वाचा असायचा कारण याच दिवशी 'सीमोल्लंघन' केले जात असे. अशा निरनिराळ्या घटनांचे एकत्रितरित्या महत्व लाभल्यामुळे भारतभर हा दिवस महत्वाचा मानला जातो. मग तो  दिल्लीतील भव्य रावण दहन सोहळा असो अथवा म्हैसूरच्या चामुंडेश्वरीची राजेशाही थाटातील मिरवणूक, आजचा दिवस हा शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असल्यामुळे मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.
                  दसऱ्याच्या दिवसाचा आणखी एक पैलू म्हणजे महाराष्ट्रात दशमीच्या दिवशी तर दक्षिण भारतात नवमीच्या दिवशी केले जाणारे आयुध पूजन! सैनिकांची शस्त्रे, कामगारांची अवजारे, तंत्रज्ञांची यंत्रे  किंवा लेखकांची लेखणी, ही सर्वच आयुधे म्हणजे त्या त्या व्यक्तींचे सामर्थ्य आहे. आपल्यातील गुणांना आणि  विचारांना मूर्त स्वरुपात आणण्यासाठी ही आयुधेच फार मोलाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे अशा आयुधांच्या प्रति आदर आणि कृतज्ञता दर्शविण्यासाठी म्हणून ही पूजा करतात.
                   दसरा या शब्दाची व्युत्पत्ती पहिली तर ती आहे 'दश'- ‘हरा' ; म्हणजे दुष्ट प्रवृत्तींचा विनाश  आणि  अर्थातच चांगल्या गोष्टींचा वाईट प्रवृत्तींवर विजय, म्हणून या दिवसाला 'विजयादशमी' असेदेखील संबोधले जाते. आजच्या दिवशी सांगितली जाणारी राम-रावणाची गोष्ट म्हणजे विजयादशमीचा पाया आहे. खोलात विचार करून पहिले तर असे वाटते की राम आणि रावण ही दोन विचारधारांची प्रतीके आहेत. ह्या दोन व्यक्तीरेखा म्हणजे मानवी मनाच्याच दोन बाजू आहेत. राम म्हणजे चांगुलपणा आणि सद्विवेक बुद्धी तर रावण म्हणजे खल मनोवृत्ती आणि अहंकार! आपण कोणीच परिपूर्ण नसतो, त्यामुळे आपल्या मनात राम आणि रावण कायमच वास करत असतात, पण महत्वाचे हे आहे की आपण कोणती बाजू स्वीकारतो! राम रावणाच्या गोष्टीत ज्याप्रमाणे राम रावणाचा वध करतो त्याचप्रमाणे स्वतःमधील चांगल्या गुणांची कास धरून स्वतःच्याच दुर्गुणांवर मात करणे म्हणजेच खरी विजयादशमी! माणसाचा स्वतःच्या सद्विवेकबुद्धीवरचा विश्वास टिकून राहावा या कारणासाठी म्हणून दसरा हा सण महत्त्वाचा आहे.
                       आमच्या सर्व वाचकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्वांच्याच आयुष्यात खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी होऊदेत हीच आमची सदिच्छा!

                                                                                                        सलील सावरकर- +६५  ८४३६०३४३
   अनुजा जोगदेव-  +९१ ८९७५७६७५९९

  

Monday, 25 September 2017

या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता!


        

          अनादी अनंत काळापासून अस्तित्वात असलेली वैश्विक ऊर्जा म्हणजे 'शक्ती'...संपूर्ण विश्वाची जननी मानली जाणारी ही ऊर्जा 'आदिशक्ती' या नावाने संबोधली जाते. आदिशक्ती ह्या विश्वातील गतिमान चैतन्याचे प्रतिनिधित्व करते. आपल्या संस्कृतीतील सिद्धांतानुसार 'ब्रह्मा-विष्णु-महेश' हे जगाच्या मूलस्थानी आहेत आणि शक्ती ही या त्रिमूर्तींच्या केंद्रस्थानी आहे. तिच्यातील गुणांद्वारे ती त्रिमूर्तींसोबत जोडली गेली आहे. राजस गुणाद्वारे ती ब्रह्मासोबत, तामस गुणातून महेशासोबत तर सत्वाद्वारे विष्णूशी जोडली गेली आहे. त्यामुळे शक्ती म्हणजे ब्रह्मदेवाची नवनिर्माण ऊर्जा, विष्णूची बुद्धिमत्ता आणि महेशाची संहारक ऊर्जा यांचा संगम आहे. म्हणून शक्ती ही अशी स्वयंनिर्मित गोष्ट आहे जी कधीच कोणी निर्माण करू शकत नाही आणि नष्ट देखील करू शकत नाही.

           अशा या आदिशक्तीचेच एक रूप म्हणजे दुर्गा किंवा महिषासुरमर्दिनी! महिषासुर या दैत्याचा विनाश करण्यासाठी सर्व देवांनी दुर्गेला पाचारण केले. देवी व दैत्यामध्ये ९ दिवस आणि ९ रात्री युध्द चालले आणि दहाव्या दिवशी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि सृष्टीला अंतापासून वाचवले. देवीने दैत्याचा संहार केला या घटनेची आठवण म्हणून आपण नवरात्री किंवा दुर्गा पूजेचा उत्सव साजरा करतो आणि या आदिशक्तीची उपासना करतो. संपूर्ण भारतात तसेच नेपाळ व बांगलादेश येथे अनेक वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जात आहे. या नऊ दिवसांमध्ये दुर्गेसोबतच महालक्ष्मी आणि सरस्वती या देवींचे पण पूजन केले जाते. ठिकठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी देवीची स्थापना केली जाते आणि विजयादशमीच्या दिवशी त्यांचे विसर्जन करतात.

           सिंह किंवा वाघावर आरूढ अष्टभुजा दुर्गादेवी म्हणजे विश्वजननीने अन्याय आणि वाईट प्रवृत्त्तीचा संहार करून जगाचे संरक्षण करण्यासाठी धारण केलेला उग्र अवतार आहे. तिच्या आठ हातांमध्ये देवांनी तिला प्रदान केलेली अस्त्रे आहेत. शंख, चक्र,धनुष्य-बाण, ढाल-तलवार, भाला आणि फास ही आयुधे तिने हातांमध्ये धारण केली आहेत. तिची आयुधे म्हणजे स्वयंशिस्त, निस्वार्थीपणा, भक्ती, ध्यान आणि चैतन्य यांची रूपके आहेत. आयुधे म्हणजे प्रत्येक योद्ध्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे बुद्धीचे उपासक दुर्गेच्या हातांमध्ये इतर शस्त्रांसोबत लेखणी देखील दाखवतात, कारण त्यांच्यासाठी लेखणी हेच शस्त्र आहे. म्हणूनच दुर्गेचे रूप हे परिवर्तनशील आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरील उग्र व तीव्र भाव म्हणजे विनाशकारी प्रवृत्तीच्या विरोधासाठी उमटलेल्या रागाचे प्रतिबिंब आहे, पण याचबरोबर ती आपल्या भक्तांसाठी उदार आणि दयाळू आहे.

           व्युत्पत्तीशास्त्रानुसार 'दुर्गा' या शब्दाचा अर्थ आहे 'अगम्य' किंवा ‘अजिंक्य'! आपल्यासाठी दुर्गा म्हणजे केवळ पौराणिक देवता नसून एक संज्ञा आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या राष्ट्राला एकत्र जोडणारे गीत 'वंदे मातरम'! स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लिहिल्या गेलेल्या या गीतामागील प्रेरणासुद्धा दुर्गाच होती. तसेच आपण आपल्या जन्मभूमीला 'भारत माता' असे संबोधतो, ही धर्मनिरपेक्ष संज्ञा आहे. कारण आपली 'भारत माता' म्हणजे केवळ हिंदूच नाही तर भारतभूमीवरील सर्व लोकांचे संरक्षण करणाऱ्या 'जगत्तारिणी दुर्गा' या रुपावरच आधारित आहे. प्रखर दुर्गा असो किंवा शांत सरस्वती, संपन्न लक्ष्मी असो किंवा तेजस्वी भारत माता, या सर्व रूपांच्या मागची संकल्पना एकच ती म्हणजे -- 'संरक्षक सार्वभौम आदिशक्ती'!. अशा अद्वितीय संकल्पनेतूनच आपल्याला भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाची जाणीव होते.

           याचबरोबर देवी ही एका महत्वाच्या गोष्टीचे प्रतीक आहे, ते म्हणजे 'सृजनाचे'! सर्जनशीलता म्हणजे या विश्वातील प्रबळ गोष्ट आहे. शौर्य, बुद्धिमत्ता, कला, ऐश्वर्य आणि सौंदर्य यांचा मिलाफ असलेली तसेच वाईट प्रवृत्तीचा नाश करून विश्वाला नवजीवन देणारी देवी म्हणजे मूर्तिमंत सर्जनशीलता! म्हणूनच नवरात्री हा सृजनाचा-सर्जनशीलतेचा उत्सव व्हावा, असे आपल्या पूर्वजांना वाटले असेल. त्यामुळे प्रत्येकानी आपल्यातील सर्जनशीलतेचे चैतन्य जागृत ठेवणे म्हणजेच या आदिशक्तीचीची खऱ्या अर्थाने केलेली उपासना!



                                                                                                 सलील सावरकर- +६५ ८४३६०३४३

अनुजा जोगदेव- +९१ ८९७५७६७५९९





Sunday, 27 August 2017

Festival of Joy!



            A year’s wait is finally over and Maharashtra’s most revered God, has now adorned all our households . ‘Ganpati Bappa’ as he is affectionately referred to, is every believer’s best friend, confidant. His arrival, signifies the dawn of a new beginning, every time he visits.  There is a unique character to this form of God, which we truly believe, is one of the best manifestations of India’s  Artistic innovation spirit. The unique curve, formed as a result of the rolled up trunk of Ganesha, is something, that we commonly find in nature. This strong resemblance and reflection in the form of Ganapati, signifies how complete the artistic creation is! It is only fitting to refer to Ganapati as the ‘Master of all Arts’, because of the comprehensive nature of his form. Likewise, art is bound to be a gift of and for this lord. Art is the product of a sum of knowledgeable ideas of the brain. Is it  because of this, that Ganapati is also referred to as the ‘God of Wisdom’? Perhaps yes!

Ganesha, is an artist’s favourite recipe. It can be handcrafted to reflect the diverse, creative thoughts of artists across the globe. Ganesha can hence be found sculpted, painted, and assembled in a variety of poses, age groups, actions. The sundry of his forms can also be found as a result of the advances and innovations in the fields of art, as also the geo political diversity.
One of the most striking features of this human sculpted God Forms, are the emptions depicted in the eyes of his idols. These emotions, are real, adorable, command respect and highly communicative – a superb mix nowhere to be found in the world. Knowingly, unknowingly, we all fall in love with him. People of all age groups, backgrounds indulge in long conversations with him. We all vaguely remember doing this at some point in our childhood, and even sometimes today.
            It is only interesting to note, that ‘Vignaharta’ as he is referred to in the recent times, was once considered as a demi God, having mysterious powers. One does not exactly know when, but Ganapati is the latest addition to the long, varied list of Indian Gods & Goddesses!
            According to mythological stories, Ganapati, was named so because he was the chief commander of the army of Gods. Likewise he also plays a crucial role in assisting Maharshi Vyas in penning down Mahabharata, India’s  biggest bestseller!
            The attraction for this superior blend of Elephant-Human God isn’t just limited to the boundaries of modern day India, but has transcended borders, and seamlessly blended  with the cultures and traditions across Asia, and also parts of Europe.
Ganapati has played a crucial role in shaping India’s political landscape, tracing back to the time of the British Rule in India. Lokmanya Bal Gangadhar Tilak, one of India’s brightest revolutionaries, and a staunch Congressman, gave a clarion call to unite Indians to fight the British by celebrating Ganesh Utsav in public domain in the year 1892. Interestingly, this year marks the 125 year celebrations of the very festival which was started in small alleys of Pune, and has now become Maharashtra’s biggest tourist attractions. Getting the sacred, protected God out of the sanctum sanctorum of the temple and holding a public installation was one of the most revolutionary concepts introduced in Hindu Religion.  Ganeshotsav played a pivotal role in uniting the already distributed, Indian public into a robust, indisputable army of spirited minds.
Today, Ganeshotsav has crossed the boundaries of continents, and is celebrated with much fervour across the world. But lest we forget, that Ganapati is a thread that binds us into the spirit of knowledge based unity. He stands for the values which know no color, no race.
It is know more than clear, why those celebrating this festival long so much for an entire calendar year to welcome their favourite God into their humble abodes. After 10 days of fun, frolic, it is time to bid our beloved Bappa a tearful farewell, only to meet next year, sooner than this. The idea behind immersing the idol signifies the high intellect of our spiritual thinkers. Ganapati is believed to be a representation of the Energy Circle or ‘Chakra’ that exists around us. This ‘Chakra’ is the foundation of the other Chakras . Energy is an entity which is never lost, but converts its form from another. Likewise, the idol too, becomes one with the water after immersion and maintains the energy balance in the cosmic universe. It gives a message to not limit our belief in the physical form of God, but also to think beyond in identifying the presence of God in all places around us.
                                                                                                      
  Saleel Savarkar - + 91-98239-00318
Anuja Jogdeo +91-89757-67599


Saturday, 26 August 2017

आनंदोत्सव!!!

          

                             

         
          दरवर्षी आपण ज्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतो तो पाहुणा आपल्या घरी आला आहे आणि या दहा दिवसांच्या आनंदोत्सवाची सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांनाच तो अगदी जवळचा वाटतो जणू काही आपल्या घरातीलच एक व्यक्ती असावी, त्याचे आगमन आपल्या घरात निराळेच चैतन्य आणते. जर आपण असे मानले कि माणसानेच हे निरनिराळ्या प्रकारचे देव निर्माण केले आहेत, तर त्यामध्ये 'गणपती' ही निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. 'सोंडेची वक्राकार रेष' ही गणपतीच्या आकृतीचे प्रतिनिधित्व करते आणि ही वक्राकार रेषा आपल्याला निसर्गात अनेक ठिकाणी आढळून येते. म्हणूनच गणपती हा खरोखर सर्वव्यापी देव आहे. एक सोपी वक्राकार रेघ, पण त्यामागची संकल्पना किती व्यापक आहे! आता ज्या देवाची आकृतीच सर्जनशीलतेचे आणि सौंदर्याचे प्रतीक आहे तर तो देव कलाकारांचा अर्थातच लाडका असणार! त्यामुळे गणपती हा बुद्धी आणि कला यांचा सुरेख मेळ आहे.
           कलाकारांचा आवडता देव गणपती आहे याचे आणखी एक कारण म्हणजे गणपतीचे स्वरूप निरनिराळ्या प्रकारांना अनुकूल आहे. पुरातन कालीन माहितीनुसार गणपतीचे एकूण ३२ प्रकार आहेत. त्यात बाल-गणेश, वीर-गणेश, भक्ती-गणेश किंवा नृत्य-गणेश अशा अनेक प्रकारांची नोंद आढळते. बदलत्या कलेच्या शैलीनुसार गणपतीचे प्रत्येक ठिकाणी निराळे स्वरूप असते. त्यामुळे अगदी जुन्या काळातील मंदिरांमधील मूर्ती, शिल्पे व चित्रे ते आजच्या काळातील ‘Modern Ganesha’, प्रत्येक कलाकार आपल्या आवडीनुसार गणपतीला चित्रित करतो. शैलीचे स्वातंत्र्य आणि पावित्र्याचे बंधन अशा स्वरुपात गणपतीचे निरनिराळ्या प्रकारात चित्रीकरण केले जाते. त्यातले कोणते स्वरूप अधिक चांगले आहे यापेक्षा महत्वाचे हे आहे की प्रत्येक प्रकारात गणपतीच्या स्वरूपाचे पावित्र्य आणि सौंदर्य कायम राहते. ही गोष्ट म्हणजे गणपतीच्या स्वरूपाच्या सर्जनशीलतेचा पुरावा आहे. गणपतीमधील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव! भोवतालच्या जगात कोठेच न सापडणारे ते भाव आपल्याला आपल्या बाप्पाच्या डोळ्यात दिसतात. कळत नकळत आपण सर्वच त्याच्या निरागसतेसोबत जोडले जातो. म्हणून आपल्याकडे गणपती हा अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा लाडका असतो. आपल्याला तो कायम आपला सखा-सोबती असल्यासारखा वाटतो.
           पुरातन काळापासून गणपतीला 'विघ्नहर्ता' असे संबोधले जाते. तसेच देवासुरांच्या युद्धात तो देवांचा सेनापती होता असे मानतात. महाभारतासारखे महाकाव्य लिहिण्यासाठी लेखनिक म्हणून श्री व्यास ऋषींनी गणेशाचीच निवड केली आणि त्याने ते कार्य यशस्वीपणे पार पाडले. बुद्धीचा व कलेच देव, चौसष्ठ कलांचा अधिपती व गणांचा अधिपती अशा अनेक विशेषणांनी त्याची महती गायली जाते. आपल्याकडे सर्वात जास्त पूजिला जाणारा देव म्हणजे गणपतीच आहे. केवळ भारतातच नाही तर नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड सारख्या देशात फार पूर्वीपासून हा देव पूजिला जातो. आपण हाती घेतलेल्या प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतो.
               गणपती खऱ्या अर्थाने आपल्या सर्व समाजाला संघटीत करणारा देव झाला ते लोकमान्य टिळकांमुळे! शिवाजी महाराजांच्या काळापासूनच आपल्याकडे प्रत्येक घरात भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात गणपती बसत असे. पण ब्रिटीशांचे राज्य आल्यावर या प्रथेचा राजाश्रय नाहीसा झाला. तसेच त्याच वेळी ब्रिटीशांनी स्थानिक लोकांना एकत्र येऊन सभा भरवणे किंवा काही कार्यक्रम करण्याची
बंदी घातली होती. पण लोकमान्यांनी यावर एक युक्ती योजिली, त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. देवघरातील गणेशाची भर चौकात प्राणप्रतिष्ठा करणे हा विचारच फार अभिनव आणि क्रांतिकारी होता. पण त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्तानी १० दिवस सर्व स्तरातील लोक एकत्र येऊ लागले. सर्व एकत्र जमून सभा घेऊ लागले, ब्रिटीश विरोधी कारवाया आखू लागले. याला धार्मिक महत्व असल्यामुळे ब्रिटीशांना यावर बंधनही घालता आले नाही. अशाप्रकारे एका लोकव्यापी चळवळीची सुरुवात झाली आणि गणेशोत्सवामुळे लोकांना संघटन शक्तीची जाणीव झाली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या उत्सवाचे स्वरूप बदलत गेले. आजच्या काळात जगभरात गणेशोत्सव साजरा करतात. प्रत्येक ठिकाणी तेथील मराठी माणसे एकत्र जमून निरनिराळे कार्यक्रम करतात, लोकांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यामुळे गणपती हा आपल्या सर्वांना बांधून ठेवणारा धागा आहे. आपल्या संस्कृतीचा जतनकर्ता आहे. 'गणपती बाप्पा मोरया' चा गजर आपल्या सगळ्यांमध्ये नवे चैतन्य आणतो, आपल्या सर्वांना एकत्र जोडतो. वर्षातील हे १० दिवस आपल्यासाठी उत्साहाने भरलेले असतात.
           या आनंदोत्सवाची सांगता झाल्यावर अनंत चतुर्दशीला गणपतीला प्रेमाने निरोप देऊन त्याच्या मूर्तींचे विसर्जन करतात. त्या प्रथेमागेदेखील एक अध्यात्मिक विचार आहे. गणपती हा उर्जेच्या चक्राचे प्रतिनिधित्व करतो असे मानले जाते. ऊर्जा चक्र हे इतर सर्व चक्रांचा पाया आहे. आपल्या सर्वांना माहित असलेल्या उर्जेच्या सिद्धांतानुसार ऊर्जा कधीच नष्ट होत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्यात हस्तांतरण होते. त्यामुळे गणपतीची मूर्ती विसर्जित झाली तरी ते तत्व, ती ऊर्जा मात्र चिरंतन टिकून राहते. अशाप्रकारे त्यानंतर केवळ मूर्तीत अडकून न राहता त्यापलीकडील असा मूर्ततेकडून अमूर्ततेकडे आणि सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारा आपला प्रवास सुरु होतो.
                                                                                                 
                                                                                                         सलील सावरकर- +९१ ९८२३९००३१८
अनुजा जोगदेव- +९१ ८९७५७६७५९९


Saturday, 8 July 2017

Guru Pournima

नमोSस्तुते व्यास विशालबुद्धे फ़ुल्लारविन्दायतत्रनेत्र
       येन त्वया भारततैलपूर्ण: प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप: 



“We bow in gratitude to the great sage, the lotus petal shaped eyed, Maharshi Vyas, who made rich contributions to the body of knoweledge with his classic ‘Mahabharata’”
                              
This is one of the ‘shlokas’ or verses found in the initial volumes of the ‘Bhagwat Gita.’ And what a better day to remember him, than today which is believed to be the Birth Anniversary of Maharshi Vyas! His illustrious body of work, which includes some of ‘Bharata’s’ best works of literature –like the ‘Mahabharata’ , the ‘Puranas’ as also the bifurcation of the ‘Vedas’ has had a lasting impact on what the world refers to as ‘Indian’ Culture. Without indulging oneself discussing the physical feasibility of ‘Mahabharata’ like many modern day intellectuals would; one can only marvel at the great knowledge of several aspects of life, of Human Nature, that Vyas penned down – those which find relevance after more than 2 millennia of its coming into existence! It is in recognition to his great volume of knowledge, that Maharshi Vyas is revered by many, as one of the greatest ‘Gurus’ this land ever produced.

‘Bharatvarsha’ or India as it is referred to in modern times, is the birthplace of knowledge. It is here that the thought “Knowledge is the only treasure which cannot be stolen; It is the only wealth which grows when utilised, and vanishes if not.” was born and blossomed.  It is because of this, that in erstwhile ‘Bharata’, it was believed that knowledge is as important a need of Man, as is Food, Shelter, Clothing. Likewise, people who make the process of knowledge gain seamless were regarded as Gurus.
                               
‘Teacher’ is a highly inadequate translation of the Sanskrit word ‘Guru’. Likewise, we also tried deciphering the popular shloka, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः We are always taught to have an unfair comparison of all our teachers with the Trinity of Bramha-Vishnu-Mahesh. However we believe that this shloka is not a praise for Gurus, but in fact a learning lesson for every Guru in the making! It in fact lays founding principles to how a Guru should be, and states the respect for he or she deserves upon attaining that stage.

Knowledge is not something one can limit to a school or a college classroom. ‘Bharata’, has been the land of seekers, rather than believers. Hence anyone and everyone here, is entitled to be a Guru to someone else. The boundaries of age, sex, occupation, human or non-human doesn’t really limit to one’s process of seeking and attaining knowledge! Our teachers, our colleagues, even people younger to us, can have lasting impressions on our lives. A Guru is not a guru because of his age or position, but because of his simple, thankless contribution of adding value and meaning to our lives. Hence the last words of the shloka तस्मै श्रीगुरवे नमःare only fitting to acknowledge ‘that person’  on this day.

Today, the world is in grave need for more Gurus and disciples! Today’s Student, will be tomorrow’s Guru. In order to pass down the vast body of knowledge of our rich and varied arts, culture, traditions, we need able Gurus and disciples. The world in order to sustain - needs India to play a vital role of a Guru by providing the world order a guiding light, as also that of a Disciple by accepting new age know-how.

Our blog for today is dedicated to the millions of persons, animate and/or inanimate who have had/made valuable contributions to our lives.

Greetings on Guru Pournima ! God Bless   


                                     

Saleel Savarkar - +91-98239-00318

Anuja Jogdeo +91-8975767599

गुरु पौर्णिमा

   “नमोSस्तुते व्यास विशालबुद्धे फ़ुल्लारविन्दायतत्रनेत्र
       येन त्वया भारततैलपूर्ण: प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप: 



कमळाच्या पाकळीप्रमाणे मोठे नेत्र असलेल्या आणि महाभारतासारख्या काव्याद्वारे ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या महर्षी व्यासांचे आम्ही वंदन करतो.

                               व्यासांना समर्पित असलेला हा श्लोक भगवतगीतेच्या आरंभी असलेल्या श्लोकमालेतील एक आहे. हा श्लोक आज इथे लिहिला कारण आजच्या दिवशी व्यास ऋषींची जयंती असते. व्यासांनी महाभारत लिहिले,पुराणे लिहिली व त्याचबरोबर वेदांचे विभाजन केले, असे आपण मानतो. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये व्यासांना अतीव आदराचे स्थान आहे. 'भारतीय संस्कृतीचे आणि पुरातन वाड्मयाचे शिल्पकार' असे म्हणून आपण त्यांचा गौरव करतो. महाभारताची गोष्ट खरेच घडली कि नाही यापेक्षा ज्या व्यक्तीला हे महाकाव्य लिहिता आले तिची बुद्धिमत्ता काय विलक्षण असेल हा विचार करणे जास्त महत्वाचे आहे. व्यासांच्या याच बुद्धिमत्तेचा सन्मान म्हणून आपण त्यांना 'सर्वश्रेष्ठ गुरु' म्हणून संबोधतो आणि त्यांचा सन्मानार्थ आजचा दिवस 'गुरु पौर्णिमा' म्हणून साजरा करतो.

                               आपल्या भारतवर्षामध्ये 'बुद्धी' किंवा 'ज्ञान' हे सर्वोच्च स्थानी मानले जातात. कारण बुद्धी ही एकमेव गोष्ट आहे कि जी आपल्या कडून कधी कोणी चोरू शकत नाही, जी वापरली असता वाढते आणि न वापरल्यास नष्ट होते. आपल्यासाठी एक ज्ञानी माणूस हा कायमच उच्च आदरस्थानी असतो. त्यामुळे 'ज्ञान संपादन' ही आपल्यासाठी अन्न,वस्त्र,निवारा यांच्याबरोबरीने येणारी मुलभूत गरज आहे. म्हणूनच आपल्या आयुष्यातील ज्ञान संपादनाच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या गुरूंचे महत्व अद्वितीय असते
                                
                           ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः हा श्लोक तर आपल्या सर्वाना लहानपणापासूनच पाठ आहे. या श्लोकाद्वारे आपल्या गुरूंची तुलना ब्रह्मा-विष्णु-महेश यांच्याशी केली आहे. आपल्या ‘आई’ नंतर कदाचित गुरु हि एकमेव व्यक्ती असेल, जिला देवत्वाशी जवळ जाण्याचा मान लाभला आहे!. पण आपण खोलात जाऊन हा विचार कधी करत नाही कि गुरूंची तुलना या त्रिमुर्तींसोबत का केली जाते? याचे कारण म्हणजे, ज्याप्रमाणे ब्रह्मा-विष्णु-महेश हे अनुक्रमे सृष्टीचे निर्माता-संरक्षक-विनाशक आहेत, त्याचप्रमाणे गुरु हे आपल्या मनात शिक्षणाची आस निर्माण करतात, आपले ज्ञान टिकून राहावे यासाठी प्रयत्न करतात आणि  त्याचबरोबर आपल्यातील अज्ञानाचा विनाश करतात ; म्हणून ते आपल्यासाठी 'परब्रह्म' असतात! दुसर्या बाजूने विचार केल्यावर असेही जाणवते, की हा श्लोक म्हणजे एका अर्थाने गुरूंसाठी लिहिला गेलेला ‘फॉर्म्युला’ आहे. एका गुरूने कसे असावे, हे तर यातून सांगण्याचा प्रयत्न नसेल ना?

                                 गुरु हे केवळ अध्यात्मिक किंवा शैक्षणिक स्तरावरचेच असायला हवे असे बंधन नसते. ज्या व्यक्तींकडून आपल्या काही नवीन ज्ञान मिळते ते आपले गुरु असतात. मग ते आपले प्राध्यापक असो किंवा सहकारी किंवा आपल्या रोजच्या आयुष्यातील माणसे. काहीवेळा आपल्यापेक्षा लहान असणारी व्यक्तीसुद्धा आपल्याला बरेच काही शिकवून जाते. नवीन गोष्टी आत्मसात करणे, ज्ञान संपादन करून आपल्यात चांगले बदल घडवणे हे माणसाच्या प्रगतीचे लक्षण आहे. जे जे लोक आपल्याला यासाठी सहकार्य करतात ते आपले गुरु असतात. फक्त माणसेच नाही तर आपल्या भोवतालची जीवसृष्टी आणि निसर्ग हे सुद्धा आपले फार महत्वाचे गुरु आहेत. काहीवेळा एखाद्या थोर माणसांनी लिहिलेले एखादे पुस्तक आपल्या आयुष्याला नवी दिशा देते. 'गुरु' या संकल्पनेमागचा विचार असा आहे की जर आपल्याला एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट आपल्यापेक्षा कर्तृत्वाने आणि ज्ञानाने मोठी वाटली तर आपण आपला अहंभाव दूर ठेऊन त्याला गुरुस्थानी मानतो, त्यातील चांगले गुण अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. आपला अहंकार विसरून जेव्हा आपण एखाद्याला शरण जातो तेव्हाच आपल्याला नवीन काहीतरी  शिकायला मिळते. तसेच नवीन काही शिकण्याची आस असेल तर कोणत्या  कोणत्या मार्गांनी आपल्याला ज्ञानप्राप्ती करता येतेच आणि आपल्याला योग्य असा गुरु आपल्याला नक्की मिळतो. मग ते आपले शाळेतील शिक्षक असतील किंवा एखादे पुस्तक किंवा आपले वरिष्ठ. आजचा दिवस हा अशा सर्व गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो
                            
                         
परंपरा जतन करण्याच्या प्रक्रियेत गुरूची भूमिका मोलाची असते. कारण संस्कृती, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान, साहित्य अशा अनेक विषयांमधील ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचवण्याचे कार्य हे त्या त्या क्षेत्रातील गुरु करत असतात. आजचा शिष्य हा उद्याचा गुरु असतो, तो आपल्या गुरूचा वारसा पुढे नेतो आणि ही ज्ञान संपादनाची साखळी अखंड चालू राहते. आपल्या सर्वांच्या आयुष्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व गुरूंना आजच्या दिवशी आम्ही हा लेख समर्पित करतो.
                                        

सलील सावरकर- +९१ ९८२३९००३१८

अनुजा जोगदेव-  +९१ ८९७५७६७५९९